चिपी विमानतळावरून सुरू असलेले श्रेय वादाचे राजकारण दुर्दैवी पहिला दर्जा जाहीर करा आणि नंतर उद्घाटनाची भाषा करा – ब्रिगेडियर सुधीर सावंत

0
100

सिंधुदुर्ग – चिपी विमानतळावरून सुरू असलेले श्रेयवादाचे राजकारण हे दुर्देवी आहे.हे विमानतळ अगोदर आंतरराष्ट्रीय असल्याचे जाहीर करा,आणि त्यानंतरच उद्घाटनाची भाषा करा,असा सल्ला माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज येथे दिला.

दरम्यान गोव्यासारखे आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात टुरिझम नको,याठिकाणी जगभरातील श्रीमंत लोक येऊन खर्च करतील आणि त्यातूनच येथील लोकांना रोजगार उपलब्ध होईल, हा आमचा प्रमुख हेतू होता. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले होते,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आज त्यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी काँग्रेसचे समीर वंजारी,राजू मसुरकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here