मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगदामधील वाहतूक बंद करणार पुढील टप्प्याच्या कामासाठी वाहतूक बंद करणार जानेवारी महिन्यात कशेडी बोगदा सुरू करण्याचे नियोजन

0
1901

 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कशेडी घाटाला पर्याय ठरलेल्या कशेडी बोगदा हा तूर्तास गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आला होता. आता या बोगद्यातील वाहतूक पुढच्या टप्प्यातील कामासाठी बंद केली जाणार आहे.अनंत चतुर्दशी झाल्यानंतर आता कशेडी बोगद्यातून सुरू करण्यात आलेली वाहतूक पुन्हा एकदा थांबवण्याचा निर्णय घेतला जाणार असून ही वाहतूक नेमकी कधी थांबवली जाते याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पुढच्या आठवड्यात सुरू करण्यात आलेला कोशेडी बोगद्यातील वाहतूक बंद करून पुढील काम सुरू केले जाणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्याने दिली.

दुसऱ्या मार्गीकेचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी लागणाऱ्या अवजड सामानाची वाहतूक सध्या सुरू असलेल्या बोगद्यातून करावी लागणार आहे. डिसेंबर 2023 अखेर कशेडी बोगद्यातील दुसरी मार्गीकाही वाहतुकीसाठी सज्ज करून जानेवारी 2024 या नवीन वर्षात वाहतूक सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आल आहे. हे काम युद्ध पातळीवर पूर्ण होण्यासाठी आणखी एका एजन्सीची मदत या कामासाठी घेतली जाणार आहे अशीही माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली आहे.

कशेडी बोगद्यातील मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी दुसरी मार्गिका सुरू करण्यासाठी काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी सुरू असलेली वाहतूक सुरक्षा म्हणून बंद केली जाणार आहे. मात्र वाहतूक नेमकी केव्हापासून बंद होईल याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. सध्या वाहतूक सुरू करण्यात आलेल्या बोगद्यामध्ये कायमस्वरूपी लाईट व्यवस्था करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू करताना या बोगद्यातून सामानाची वाहतूक व्यवस्था केली जाणार आहे.

सुरक्षेसाठी पुढील टप्प्याचे काम करताना या सगळ्याचा विचार करून पुन्हा एकदा आढावा घेऊन सुरू असलेली वाहतूक पुन्हा एकदा काही काळ बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे.

*मुंबईकडे येताना पर्यायी मार्गांचा वापर करा*

कोकण व गोव्याकडून मुंबई ठाणे पुणे पालघर या दिशेने जाताना राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी मार्गांचा वापर केल्यास हा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. माणगाव वरून पाली खोपोली मार्गे मुंबई पुणे ठाणे पालघर च्या दिशेने जाता येऊ शकते.

*नवीन आंबेत पुलाच्या प्रस्तावाकडे शासनाची डोळेझाक*

रत्नागिरी रायगड जिल्ह्यात जोडणारा आंबेत पूल अद्याप सुरू करण्यात न आल्याने पर्यटक व प्रवाशांचे ऐन गणेशोत्सवात हे मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे हा पूल दुरुस्ती करून सुरू केल्यानंतर तातडीने याच ठिकाणी नव्याने पूल बांधण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी कोकणवासीयांकडून करण्यात आली आहे. नव्या पुलाचा सुमारे 175 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे यावर्षी नव्याने महाड माणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठवण्यात आला आहे मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष करत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

कोकण गोव्याकडून पुन्हा मुंबई पुण्याकडे येताना कशेडी घाटाचा प्रवास टाळण्यासाठी रत्नागिरी – गुहागर तालुका जोडणाऱ्या राई भातगाव पुलाचा वापर करून पुढे दाभोळ खाडीवर असलेल्या फेरीबोटीतून दापोली लाटवण महाड मार्गे मुंबईच्या दिशेने जाता येणार आहे. मात्र मुंबईकडे जाताना हा कशेडी बोगद्याचा वापर करता येणार नसल्याचे रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल आहे.

मुंबईकडून कोकणात येणाऱ्या हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक व दुचाकीची वाहतूक या बोगदा मधून सुरू केल्याने 40 मिनिटांचा प्रवास आता थेट सुमारे दहा मिनिटांवर आला होता. गणेशोत्सव काळात हा कशेडी बोगदा सुरू करण्यात आल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आल होते. मात्र आता पुन्हा पुढील कामासाठी हा बोगदा वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे आता नवीन वर्षातच या बोगद्यातून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल आहे

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या प्रवाशांकडून वाहन चालकांकडून हा बोगदा सुरू करण्यात आल्याने वेळ व इंधनाची बचत झाल्याने मोठे समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here