जनतेला गृहीत धरून सत्तेच्या छायेत गेलेल्या १९ उमेदवारांचा दारुण पराभव

0
132

जनतेला गृहित धरुन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपा-शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांना मतदारांनी मोठा दणका दिला आहे. या ३५ नेत्यांपैकी १९ उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. इतर पक्षांतून भाजपात आलेल्या वैभव पिचड (राष्ट्रवादी), हर्षवर्धन पाटील (काँग्रेस), गोपालदास अग्रवाल (काँग्रेस), गोपिचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी), धैर्यशील कदम (काँग्रेस), रमेश आडसकर, भरत गावित, उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) या भाजपात प्रवेश केलेल्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. तर, जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस), दिलीप सोपल (राष्ट्रवादी), भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), शेखर गोरे (राष्ट्रवादी), रश्मी बागल (राष्ट्रवादी), विजय पाटील, संजय कोकाटे, दिलीप माने (काँग्रेस), नागनाथ क्षीरसागर, निर्मला गावित (काँग्रेस), प्रदीप शर्मा या शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. पराभव झालेल्या या उमेदवारांमध्ये शिवसेनेचे ११ तर भाजपाच्या ८ उमेदवारांचा समावेश आहे. या निकालाद्वारे पक्षांतर करणाऱ्यांना जनतेने दिलेले हा सर्वांत मोठा संदेश आहे की आयाराम कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांचा पराभव होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here