सिंधुदुर्ग – कोरोनाचा काळात जीवाची पर्वा न करता डॉक्टरांनी काम केले.
परंतु या डॉक्टरांचे चार महिन्यांचे मानधन न दिल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आलेल्या १७ पैकी १६ डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
याबाबतची माहिती जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात आली नसताना देखील जीवाची पर्वा न करता सेवा करणाऱ्या डॉक्टरांनी चार चार महिने मानधन मिळत नसेल तर त्यांनी का सेवा द्यावी, असा सवालही देसाई यांनी उपस्थित केला आहे.