रिफायनरीविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटना विसर्जित

0
197

राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी लढय़ात शेतकरी, मच्छीमार बांधवांना संघटीत करून शासनाला प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यास भाग पाडणारी रिफायनरीविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटना विसर्जित करण्यात आली आहे. नाणार रिफायनरीचा विषय संपल्याने संघटना विसर्जित करण्यात आल्याची माहिती संघटना सचिव भाई सामंत यांनी दिली.

नाणार रिफायनरीविरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सभेत संघटना विसर्जित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. रिफायनरीविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटना फक्त रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थापन केली होती. संघटनेचा अन्य कोणताही राजकीय विषय नव्हता. संघटना स्थापन झाल्यापासून संघटनेने खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्या साथीने यशस्वी लढा देताना मोजणी रद्द करणे, तालुका एक दिवस बंद ठेवणे, समर्थपणे सर्व गावच्या सुनावण्या चालवणे, राजकीय पक्षांचे समर्थन मिळवणे, मॅग्नेटीक करार रद्द करून घेणे, अनेक मोर्चे-आंदोलने करून अंतिमतः अध्यादेश रद्द करून घेण्यापर्यंत योगदान दिले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत रिफायनरी रद्द झाल्याचे राजपत्र संघटनेच्या हातात देऊन हा विषय संपल्याचे घोषित केले. याबद्दल सभेमध्ये ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. सामाजिक विकासासाठी आता शेतकरी मच्छीमार सामाजिक विकास संघटना या नावाने नवीन सामाजिक संघटना स्थापन करण्याचा व पुढील 4 दिवसांत संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे सचिव भाई सामंत यांनी सांगितले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here