सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबू उत्पादक शेतकरी आणि व्यावसाईक यांची सध्या मोठी पंचाईत झाली आहे. लाॅकडाऊन पुर्वी तोडलेला सुमारे २ हजार ट्रक बांबू सध्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पडून आहे. गोवा, कर्नाटक, केरळ आदि राज्यात इथला बांबू जात असून येथील माणगा जातीच्या बांबूला मोठी मागणी आहे. तोडलेला बांबू वाहतूक करून बाजारपेठेत पोचविण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी करताहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८०० हेक्टर क्षेत्रात बांबूची लागवड आहे. काही भागात नैसर्गिकरीत्या वनांमध्ये बांबू रुजून येतो ते क्षेत्र वेगळेच आहे. शिवाय शेतकऱ्याच्या बांधावरही पारंपरिक बांबू लागवड आहे. या सर्व शेत्रातून केवळ माणगा जातीच्या बांबूचे दरवर्षी २ हजार ट्रक उत्पन्न येथील शेतकऱ्याला मिळते. जिल्ह्यात बांबूचे उत्पादन घेणारे १० हजार शेतकरी आहेत. एक एकराला वर्दीषाला ड लाख रुपयाचे उत्पन्न बांबू देत असून कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय मिळणार हे उत्पन्न आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणारी माणगा ही केवळ खाजगी क्षेत्रातच मुबलक उपलब्ध होणारी महाराष्ट्रातील किंबहुना, देशातील ही एकमेव अशी बांबूची जात आहे. माणगा जातीसोबत चीवार हि दुसरी एक जात जिल्ह्यात सापडते. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची खरे तर ही छुपी अर्थव्यवस्था आहे. येथील शेतकरी त्याला २४ तास कधीही परतावा देण्याची खात्री असणारे फिक्स डिपॉझीट मानतो. एमआरजीएस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांणा शासनाने अनुदान देत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित केले आहे.
दरम्यान सध्या जिल्ह्यात तोडून घेतल्जायानंतर जाग्यावर पडून असलेला बांबू योग्य वेळी बाजारपेठेत गेला नाही तर दीड महिन्यावर आलेला पावसाळा बांबू व्यावसाईक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करू शकतो.