शेतकर्‍यांच्या आंदोलनाला अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा पाठिंबा जिल्हा परिषदेसमोर केले धरणे आंदोलन

0
93

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी कर्मचारी या शेतकऱ्यांची मुले आहेत असे सांगत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. याकरता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या जिल्हा परिषदेसमोर केले धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच या आंदोलनात आतापर्यंत ५४ शेतकऱ्यांचे बळी गेले असून केंद्र सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी केली आहे.

शेतकरी विरोधी कायदा विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. केंद्र सरकार शेती मोडीत काढून त्या जमिनी कार्पोरेट क्षेत्राच्या घशात घालण्या प्रकार सुरू केला आहे. याला विरोध करण्यासाठी आणि शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी २६ नोव्हेंबर पासून दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आज सोमवारी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपणही शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांवर होत असलेले अन्याय चुकीचा असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी जीप समोर मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर थंडीतही पाण्याचा मारा करण्यात आला. हा शासनाकडून चाललेला एक प्रकारचा छळ असल्याची टीका करतानाच या आंदोलन काळात ५४ शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आंदोलनावर तात्काळ तोडगा काढावा तसेच शेतकऱ्यांची शेती वाचवावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांनी शासनाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here