सिंधुदुर्ग – कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ आज कणकवली मुडेश्वर मैदान ते प्रांत कार्यालयापर्यंत आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतुन भाजपने ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे, आमदार नितेश हे मोर्चाच्या अग्रस्थानी होते. यावेळी चंद्रकांतदादा पाटील आणि नारायण राणे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
चंद्रकांतदादा पाटील यांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
उद्धव ठाकरे यांना मी अनेकवेळा विचारलं शेतीविषयी मात्र त्यांना काहीचमाहीत नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे काय खासगी बाजार समिती म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. काँग्रेसने तीन वेळा हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना शक्य झालं नाही. 2017 पासूनच आमचं सरकार असताना हा कायदा आम्ही लागू केला होता. त्यावेळी तीन महिने राज्यात व्यापाऱ्यांनी संप केला होता मात्र आम्ही पर्यायी व्यवस्था करून आम्ही शेतकऱ्याचा माल विकला. पूर्वी 60 हजार कोटींची माल बाहेरच विकला जात होता. तर मार्केट मध्ये 40 हजार कोटींची माल येत होता. खरतर मार्केटमध्ये 1 लाख कोटींचा माल आला पाहिजे मात्र कायदा येण्या आधीच 60 हजार कोटींची माल बाहेर विकला जात होता. असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मनात मोदींनी जागा मिळविली म्हणून त्यांना लोकदाभेत आजचे बहुमत मिळाले आहे. 2024 ला हे बहुमत वाढेल आणि आपलं काय होणार हे कॉंग्रेला माहीत आहे म्हणून त्यांनी मोदींना विरोध केला असल्याचे ते म्हणाले. आता 55 आहेत ते 5 खासदार होतील ही भीती काँग्रेसला आहे म्हणून ते मोदींना विरोध करताहेत. महाराष्ट्रातही हे तिघे जास्त दिवस एकत्र राहणार नाहीत असे ते म्हणाले. हिम्मत असेल तर एकत्र लढा असे सांगताना पुणे पदवीधर मध्ये काही मतदार हे पदवीधर नसल्याचे ते म्हणाले.
नारायण राणे यांची राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
खासदार नारायण राणे यांनी यावेळो राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांना शेतीतील काय कळत अस यावेळी राणे म्हणाले तर उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या बसून घरात बसून सरकार चालवतो. सगळं बंद याला काय फरक पडतो. मुख्यमंत्री म्हणून मानधन मिळत आणखी बराच काही मिळत आणखी बरंच काही याची फोड करून घ्या असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकार गप्प आहे. मोदींनी मात्र कृषी विधेयकातून देशातील शेतकऱ्याला नवसंजीवनी या विधेयकातून दिल्याचे ते म्हणाले.
कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी खिशात दमडी तरी टाकली का ?
कोरोनाच्या काळात आलेल्या कोरोनसह संकटात पंतप्रधान किसन योजनेतून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सावरलं मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खिशात दमडी तरी टाकली का ? असा प्रश्न यावेळी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केला. शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदी यांनी 3 लाखाचे पॅकेज जाहीर केले. मत्स्य उद्योगासाठी 15 हजार कोटींची पॅकेज दिले. शेतकऱ्यांसाठी कृषी उत्तपन्न बाजारसमित्या केल्या होत्या त्या शेतकऱ्याच्या कर्दनकाळ केलं. त्यांच्या बेड्यातून या विधेयकामुळे शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. असे ते म्हणाले. काँग्रेसने शेतीच्या कराराचा कायदा महाराष्ट्रात केला. मात्र तेच काँग्रेसवाले मोदींवर टीका करत आहेत. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनांचे समर्थन मात्र त्याच्यातून फुटलेले राजू शेट्टी मात्र विरोध करताहेत. सिंधुदुर्गात भात, फळ यांच्यासाठी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन व्हावी असेही ते यावेळी म्हणाले.
कोकणातील ही पहिली ट्रॅक्टर रॅली
आमदार नितेश राणे म्हणाले विधेयकाच्या समर्थाना साठी कोकणातील ही पहिली ट्रॅक्टर रॅली आहे. कोकणातला आंबा मोठ्या बाजारपेठेत विकला जाऊ शकतो, दोडामार्गचा काजू गुजरातला विकला जाऊ शकतो ही ताकद या विधेयकात आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विधेयकाची ताकद कळल्यानेच या मोर्चात महाराष्ट्रातला शेतकरी उतरला नाही. इथला शेतकरी या विधेयकाकडे आशेने पाहतोय. हे विधेयक नेमके काय आहे हे शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.