चिपी विमानतळाचे श्रेय केंद्रीयमंत्री नारायण राणेंनाच – भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार

0
122

सिंधुदुर्ग – चिपी विमानतळासाठीचे भूसंपादन विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणेंमुळे शक्य झाले होते.

त्यामुळे तुमची इच्छा असो अथवा नसो… चिपी विमानतळाचे श्रेय हे नारायण राणेंनाच द्यावे लागेल, अशा ठाम शब्दांत भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेनेला ठणकावून सांगितले आहे.

जठार यांनी असेही म्हटले आहे की, जर आम्ही आवाज उठवला नसता तर चिपी विमानतळाला राज्य शासनांतर्गतआवश्यक असणारा रस्ता, भूमिगत विजवाहिनी, पाणी आदी सोयींबाबत पालकमंत्री सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी आढावा बैठकही घेतली नसती. असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here