कोकणात रायगड जिल्ह्यात मुरुड काशीद समुद्र किनाऱ्यावरती पर्यटनासाठी आलेल्या चार विद्यार्थी समुद्रात बुडाल्याने खळबळ उडाली आहे. यापैकी चौघांपैकी दोन जणांना वाचवण्यात यश यश आले आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज ही घटना 9 डिसेंबर रोजी आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.दरम्यान दरम्यान घटनास्थळी अलिबागच्या प्रांताधिकारी प्रशांत ढगे ,तहसीलदार रोहन शिंदे व पोलीस यंत्रणेनी धाव घेतली.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील ७० मुले आणि ७ शिक्षक मुरूड काशीद पर्यटनासाठी आले होते. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेत असतानाच काही विद्यार्थी समुद्र स्नानासाठी समुद्र स्नानासाठी समुद्रात गेले होते. या विद्यार्थ्यांना समुद्राचा अंदाज मिळाल्याने ते बुडू लागले
ही बाब निदर्शनास येताच किनाऱ्यावरील लाईफ गार्ड आणि स्थानिकांच्या मदतीने दोघांना वाचवण्यात यश आले आहे. काशिद समुद्र किनारी ही घटना घडली. 1) प्रणय संजन कदम
2) रोहन संतोष बेडवाल 3) कृष्णा विजय पाटील 4) तुषार हरीभाऊ वाघ हे चार विद्ययार्थी समुद्राच्या पाण्यात बुडाले होते. 1) कृष्णा पाटील 2) कृष्णा वाघ यांना वाचविण्यात यश आले आहे. यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे पाठविण्यात आले आहे. दोघांची प्रकृती उत्तम आहे. मात्र 1) प्रणय कदम
2)रोहन संतोष बेडवाल या दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोघांचेही मृतदेह मुरुड येथील समुद्रात मिळाले आहेत.