लॉकडाऊनमुळे भाजी उत्पादकांचे कंबरडे मोडले, कणकवलीतील शेतकऱ्याची 40 टन कारली शेतात पडून

0
155

 

लॉकडाऊनमुळे आधीच स्थानिक बाजारपेठा बंद, त्यात गर्दी रोखण्यासाठी नवी मुंबई एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम कोकणातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा तयार माल पडून आहे.

सिंधुदुर्ग जिल्यातील कणकवली सावडाव येथील तरुण शेतकरी सिद्धी उत्तम वारंग यांनी आपल्या ३ एकर शेतात कारल्याची लागवड केली होती. त्यांनी आतापर्यंत १० ते १२ टन कारली वाशी मार्केटला पाठवली, मात्र अजून 40 टन कारली शेतात असल्याने त्याच करायचं काय असा प्रश्न उत्तम वारंग यांना पडला आहे. कणकवली मधून कोल्हापूर जवळ असलं तरी दर मिळत नसल्याने ते मुंबई वाशी मार्केटला कारली पाठवतात. कोरोनामुळे बाजारपेठ बंद आहेत. रस्ते वाहतूक बंद आहे. त्यामुळे शेतातील कारली तशीच पडून खर्च वाढत असल्याने उत्तम वारंग यांनी दीड एकर मधील कारल्याच्या वेली कापून टाकल्या. वारंग यांना तीन एकर कारल्याची शेती करायला व इतर साहित्य घेण्यासाठी ८ लाख रुपये खर्च आला. मात्र चांगलं उत्पन्न मिळणार अशी अपेक्षा असताना कोरोनामुळे पदरी निराशा पडल्याची स्थिती आहे. कारल्याच्या शेतीतून ६० लाखांची अपेक्षा केली होती. मात्र कोरोनामुळे कंबरडं मोडलं असल्याची प्रतिक्रिया सिद्धी उत्तम वारंग यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here