अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला – संजय राऊत

0
127

अजित पवार यांच्या भूमिकेमागे शरद पवार यांचा किंचितही हात नाही. अजित पवार हे काळ रात्री आमच्यासोबत होते मात्र ते आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हते. हे आमच्या आणि शरद पवार यांच्याही लक्षात आले होते. असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. ते आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. शरद पवार याना दगा दिला आहे. रात्रीच्या काळोखात महाराष्ट्रात भाजप आणि अजित पवार यांच्या सत्तेचं पाप घडलेले आहे महाराष्ट्रातील जनता हे पाप सहन करणार नाही. अजित पवार रात्री मिटिंग मधून ते अचानक निघून गेले. फोन बंद लागत होता. माहिती घेतली तर ते वकिलाकडे बसले असल्याचे सांगितले गेले, आता कळलं ते कोणत्या वकिलाकडे बसले होते असे राऊत पुढे म्हणाले. अजित पवारांसह सर्वानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या नावाला काळिमा फासल्याचेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचंही फोनवर बोलणं झाल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here