27.1 C
Panjim
Tuesday, March 21, 2023

राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेला पक्षात कार्यकर्त्ये टिकवून ठेवण्याची चिंता – भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – शिवसेनेने भाजपा नेत्यांची काळजी करू नये. माजी मुख्यमंत्री नारायण राणे देशाचे कॅबिनेट उद्योग मंत्री झाले असल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. आता शिवसेनेत कार्यकर्त्ये राहतील की नाही याची चिंता शिवसेना नेत्यांना लागली आहे. अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.

आज सिंधुदुर्गात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळाले म्हणून कोणाच्या पोटात दुखण्याची गरज नाही. सेनेचे खासदार आणि आमदार भाजपा च्या मतदानावर निवडून आले आहेत हे त्यांनी विसरू नये. ते ते म्हणाले.

नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्याने आता रखडलेलं एअरपोर्टचं कामही लवकरच मार्गी लागेल. तसेच हायवेचा प्रश्न, सागरी महामार्ग, बीएसएनएलच्या नेटवर्कचा प्रश्न असे इतर प्रश्न, जे खासदारांना जमले नाहीत, ते लवकरात लवकर आता पूर्ण होतील. असेही तेली यावेळी म्हणाले.

हिम्मत असेल तर राजीनामे देऊन शिवसेनेने मैदानात यावे. त्यांना त्यांची जागा दाखवुन देऊ.या पुढच्या सर्व निवडणूकीत तिन्ही आमदार आणि खासदार भजपाचाच असेल असे मत राजन तेली यांनी मांडले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles