सिंधुदुर्ग – कोरोनाच्या काळानंतर वादात सापडलेली गोवा महाराष्ट्र सीमेवरील पत्रादेवी येथे टाकण्यात आलेली लाठी आज अखेर सुरू करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग प्रशासनाने ही लाठी सुरू करून गोवा प्रवेशाचा आपल्याकडील मार्ग खुला केला आहे.
आज दुपारच्या सुमारास त्या ठीकाणी प्रशासनाने जावून हा निर्णय घेतला. दरम्यान ही लाठी सुरू करण्यात आल्यामुळे बांदा तसेच सिमेवरच्या गावांसह व्यापार्यांनी आमदार दिपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.
तसेच आता गोव्यानेही त्या ठीकाणी प्रवेश देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी सिमेवरील ग्रामस्थांकडुन होत आहे.
महाराष्ट्रातून एक पाऊल टाकण्यात आले आहे. आता गोव्यात येथील नोकरदाराणा प्रवेश देण्यासाठी गोवा सरकार काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.