आंबोली घाटात दाट धुक्यामुळे वाहन चालवताना येताहेत अडथळे वाहतूकदार करताहेत जीव मुठीत घेऊन प्रवास

0
155

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सध्या पर्यावरणीय बदलामुळे दुपारपर्यंत उन्हाळा, सायंकाळी पाऊस, भल्या पहाटे थंडी आणि धुकं अनुभवता येत आहे. तसेच दाट धुक्यामुळे आंबोली घाटातून वाहन चालवताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहतूकदारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. आंबोली घाटात आणि तळकोकणात सावंतवाडीत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. गेले काही दिवस उन्हाळा आणि पावसाळा एका दिवसात लोकांना अनुभवायला मिळत आहे तसेच अधून-मधून थंडीची देखील लहर येत आहे. त्यामुळे उन्हाळा थंडी पावसाळा अनुभवता येत आहे.

पर्यावरणीय बदलामुळे हे प्रकार होत असावे अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेले दोन दिवस दुपारपर्यंत उन्हाळा आणि सायंकाळी पाऊस कोसळत आहेत तसेच भल्या पहाटेच्या वेळी गुलाबी थंडीची लहर अनुभवता येत आहे अधून मधून भल्या पहाटे धुके देखील पडत आहे.आंबोली परिसरामध्ये आणि तळकोकणात सावंतवाडी परिसरात आज भल्या पहाटे पासून धुक्याची चादर पसरली होती त्यामुळे आंबोली घाटातून वाहनचालकांना वाहन चालवताना अडथळे आले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here