दिवाडी बेटावर स्थित श्री सप्तकोटेशवर हे गोव्यातील कदंब राजांचे राजदैवत होते . १५४० च्या दरम्यान पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीत हे मंदिर भग्न करण्यात आले होते. डिचोली गावातील काही हिंदूंनी शिवलिंग नदी पलिकडे लपवून सुरक्षित ठेवले. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६८ साली कोकण-गोवा स्वारी दरम्यान नार्वे येथे श्री सप्तकोटेश्वराची पुनर्स्थापना केली.
पराक्रम आणि पावित्र्य यांचा इतिहास असलेल्या श्री सप्तकोटेश्वराकडे, सर्व जनतेला नववर्षी सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट दे अशी प्रार्थना केली.