सिंधुदुर्गात आग लागून ४ एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक शॉर्टसर्किटने लागली आग

0
116

 

सिंधदुर्ग – जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या डिंगणे-बांबरवाडी येथे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर क्षेत्रातील काजू बागायतीला आग लागली आहे. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. येथील महेश बांदेकर, राजन बांदेकर यांची हि काजूबाग आहे.

शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान

डिंगणे-बांबरवाडी येथे आज दुपारी शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे ४ एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.आगीत महेश बांदेकर, राजन बांदेकर यांच्या मालकीची काजू बाग जळाली. ऐन हंगामात काजू बाग जळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले.

शॉर्टसर्किट होऊन लागली आग

बांदेकर यांच्या काजू बागायती लगतच उच्च दाबाची वीज वहिनी जाते. याठिकाणी आज भर दुपारी शॉर्टसर्किट होऊन आग लागली. दुपारची वेळ असल्याने व वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिकांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने काजू बागायतीला वेढल्याने संपूर्ण बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

आग वीजवण्याचे करण्यात आले प्रयत्न

शेतकऱ्यांचे पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न अपुरे पडले. यामध्ये ४ एकर क्षेत्रातील शेकडो काजूची कलमे आगीत जळून खाक झाली. ऐन काजू हंगामात बागायती जळाल्याने शेतकरी आर्थिक मेटाकुटीस आला आहे. आगीची कल्पना दिल्यानंतर महावितरणचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी आग शॉर्टसर्किटने लागल्याने महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here