महाराष्ट्रात भाजपाला सत्तास्थापनेच राज्यपालांकडून निमंत्रण

0
150

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. याचबरोबर राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबरपर्यंत (सोमवार) बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं आहे.  या अगोदर फडणवीस यांनी राज्यात भाजपाच्याच नेतृत्वात सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. दरम्यान राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटणार असल्याचे दिसत आहे.

राज्यपालांकडून भाजपाला यासंदर्भात पत्र पाठवण्यात आलं असल्याची माहिती आहे. राज्यपालांकडून आलेल्या पत्रावर भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय होणार असल्याचं भाजपा नेते सुधीर मुगंटीवार यांनी सांगितलं आहे. राज्यपालांनी निमंत्रण देणं हा घटनात्मक प्रक्रियेचा भाग आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here