महाविकास आघाडी सरकारचे एक वर्ष काळ्या दिवसासाखे, परशुराम उपरकर यांचा कणकवलीत आरोप कणकवलीत बोलताना केली टीका

0
151

सिंधुदुर्ग – सध्याच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. या सरकारने जनतेची अत्यंत निराशा करून ठेवलेली आहे. हे सरकार न्याय देणार नाही तर जनतेवर अन्याय करणार आहे. सरकारचे एक वर्ष काळ्या दिवसासाखे आहे अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

कणकवली येथे माणसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. या सरकारच्या स्थापनेवेळची नाटके जनतेने पहिली आहेत. कशाप्रकारे विरोधाभास असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात हे जनतेने पाहिलेलं आहे. या सत्तेतून जनतेची काम व्हावीत किंवा त्यांचा कुठेतरी सुखकर प्रवास व्हावा यासाठी जनता अपेक्षेमध्ये होती. मात्र या कॅव्हिडच्या काळात सरकारने जनतेचा अपेक्षाभंग करून ठेवली आहे. असे ते यावेळी म्हणाले.

चांगली आरोग्य सुविधा हे सरकार देऊ शकलेलं नाही. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचीही अत्यंत वाईट स्थिती आहे. जिल्ह्यातील आरोग्याच्या जागा रिक्त आहेत. ज्यांची कंत्राटी भरती कॅव्हिडच्या काळात केलेली आहे त्यांचे अजूनही पगार झालेले नाहीत. जिल्ह्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. केंद्राने कामगार कायदा आणला त्यात कामगारांवर अन्याय करणारे सरकारचे धोरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना जिल्ह्यात पालकमंत्री, आमदार, खासदार मोठमोठ्या घोषणा करत आहेत. एकाबाजूला तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी रुप्याच्या कामाच्या घोषणा करायच्या हे धोरण दिशाभूल करणारे आहे. हे पैसे कुठून आणणार हे मात्र हे लोक सांगत नाहीत. जिल्ह्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मच्छिमारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे सत्ताधारी लक्ष देत नसल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here