सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील कणकवली नरडवे मार्गावरील नाटळ येथे असलेला मल्हार पूल पावसाच्या तडाख्यात सापडून कोसळून गेला. त्या पुलाच्या नुकसानीची पाहणी आज पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना नेत्यांनी केली.
कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करत स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास साकव उभारणी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या आहेत.
मुसळधार पावसाने आलेल्या पुरात सापडून मल्हार पूल कोसळला. त्यामुळे या ठिकाणच्या पाचहुन अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देत आढावा घेतला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, डिवाय एसपी नितीन कटेकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कातकरी अभियंता संजय शेवाळे, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, तहसीलदार रमेश पवार, बीडीओ अरुण चव्हाण, उपअभियंता के. के. प्रभू हेमंत सावंत, संतोष सावंत आदी उपस्थित होते.