सिंधुदुर्ग – गेली चार महिने पालकमंत्री दौरे करतात त्यांना कोणी विचारेल आहे काय कितीवेळा कोरोना टेस्ट केली म्हणून ?ते रत्नागिरी मुंबई असे कोरोनाचा प्रभाव असलेल्या परिसरातून येतात.आज पर्यत कितीवेळा त्यांनी आपली चाचणी केली.मी चारवेळा माझी स्वतःची कोरोना टेस्ट केली.भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार जेव्हा जेव्हा जिल्हयात येतात तेव्हा कोरोना टेस्ट करतात.तुम्ही का करत नाही ? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला.
मास्क लावणे,हातात ग्लोज घालणे,शनिटायझर करणे हे नियम फक्त सामान्य जनतेलाच असतात काय ? सत्ताधाऱ्यांना आणि पालकमंत्र्यांना हे नियम नाहीत काय ?असा सवाल फेसबुक लाइव्ह बर बोलतांना केला. प्रत्येक लोकप्रतिनिधीने हे नियम पाळलेच पाहिजेत असे आम.नितेश राणे म्हणाले.आम.वैभव नाईक हे कोरोना पॉझिटिव्ह आले त्यांना ही लागण कशी झाली.असेही ते म्हणालेत.



