महाविकास आघाडीचे सरकार कोकणी माणसाचे दुःख पुसणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आश्वासन

0
154

 

सिंधुदुर्ग – तौक्ते चक्रीवादळात कोकणातील झालेले नुकसान पाहता येथील लोकांच्या दुःखाचं निराकरण करता यावं म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. असे सांगतानाच मुख्यमंत्रीच्या दौऱ्यावर करणाऱ्या विरोधकांनी लक्षात घ्यावे तुमचे पंतप्रधान नुकसानीची पाहणी करताना विमानातून जमिनीवरही उतरले नाहीत. मात्र मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्वतः लोकांशी संवाद साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोकणी माणसाचे दुःख पुसण्यासाठी ठोस पावले उचलेल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी म्हटले आहे.

राज्यपालांनी 12 आमदारांच्या यादीला मान्यता द्यावी

कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सिंधुदुर्गात नुकसान ग्रस्त भागाची रविवारी पाहणी केली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा टीका केली. पटोलर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. राज्यपाल राज्याचे प्रमुख आहेत. जर आमचं काय चुकलं असेल ते त्यांनी सांगणं हा त्यांचा अधिकार आहे. पण मात्र अशी 12आमदारांची यादी दाबून ठेवणे योग्य नाही. मुंबईचं गव्हर्नर ऑफिस हे भाजपचं कार्यालय झालं आहे. हे होता काम नये, कारण राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. त्याला सगळ्यांचे कान ओढण्याचा अधिकार असतो. पण त्या त्या क्षेत्रातील लोकांची यादी जेव्हा कॅबिनेटचा निर्णय घेऊन राज्यपालांकडे पाठविली जाते तेव्हा राज्यपालांनी त्यावर विचार करायला हवा. एखादी व्यक्ती त्या क्षेत्रातील नसेल तर सरकारला सांगायला हवं. जे नियमात बसत नसले तर त्यात शासन बदल करू शकतं. पण ते दाबून बसणं आणि त्या क्षेत्रातील प्रतिनिधीला संपवण हे भूमिका चुकीची आहे. म्हणून राज्यपाल महोदयाना विनंती आहे की या सर्व प्रकरणावर पडदा पडावा आणि 12 आमदारांची नाव पाठवली त्यांना मान्यता द्यावी.

केंद्राकडून महाराष्ट्राला 2 हजार कोटी मिळतील अशी आमची अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची हवाई पाहिणी केली. पण महाराष्ट्रत नाही केली. ते देशाचे प्रधानमंत्री आहेत.अस म्हणत पटोले यांनी टीका केलीय त्यामुळे गुजरातला 1 हजार कोटी दिले तर महाराष्ट्राला 2 हजार कोटी मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे. डिजास्टर मॅनेजमेंट कायद्याच्या 2005 च्या अंतर्गत संविधानिक अधिकार हे त्या त्या राज्याच्या जनतेचे आहेत. केंद्र सरकार मदत देणार म्हणजे उपकार करणार असं नाही. मोदींच महाराष्ट्रावर वक्रदृष्टी आहे की प्रेम याच अजून दर्शन झालेलं नाही. जे महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीच नुकसान झालेलं आहे, जो महाराष्ट्राचा वाटा आहे, जस तातडीने हेलिकॉप्टरमधून गुजरातला फिरून 1 हजार कोटी रुपये दिलेत तसाच एक हवाई दौरा महाराष्ट्रात करून तातडीने 2 हजार कोटी द्यावेत. ही नम्र विनंती मोदींना आहे. असे पाटोळे यावेळी म्हणाले.

पंतप्रधान केअर फंडातून देण्यात आलेले व्हॅटिलेटर नादुरुस्त

पंतप्रधान केअर फंडातून देण्यात आलेले व्हॅटिलेटर नादुरुस्त आहेत. म्हणजे प्रधानमंत्र्याच्या कार्यालयातुनचं भ्रष्टाचार सुरू झालेला असेल तर ते मुंबईतील केईएमचे काय म्हणता तिथेही हेच चालेल आहे. या कोरोना आजाराचा फायदा घेऊन सामान्य जनतेची लूट झालेली आहे हे मान्य आहे. केईएम मध्ये जो भ्रष्टाचार केलाय त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेस कडून करण्यात येईल असेही नाना पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here